1 Gambhir: गौतम गंभीरच्या 'या' विधानाने उडाली खळबळ; कोहलीबाबत असं काही बोलला की सारेच झाले हैराण - Cricket Veda
  • Privacy Policy
Saturday, March 4, 2023
  • Login
  • होम
  • ताज्या बातम्या
  • आयपीएल
  • अन्य खेळ
  • लेख
No Result
View All Result
Cricket Veda
  • होम
  • ताज्या बातम्या
  • आयपीएल
  • अन्य खेळ
  • लेख
No Result
View All Result
Cricket Veda
No Result
View All Result

Gambhir: गौतम गंभीरच्या ‘या’ विधानाने उडाली खळबळ; कोहलीबाबत असं काही बोलला की सारेच झाले हैराण

by Rahul
October 19, 2022
in क्रिकेट, अन्य खेळ, ताज्या बातम्या
0
Gambhir: गौतम गंभीरच्या ‘या’ विधानाने उडाली खळबळ; कोहलीबाबत असं काही बोलला की सारेच झाले हैराण

Gambhir:  टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि फलंदाज विराट कोहलीवर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भारतीय संघ 23 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने वर्ल्डकपच्या मोहिमेची सुरुवात करेल. याआधी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ सराव सामना खेळत आहे. दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य केले आहे.

आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणार्‍या गौतम गंभीरने विराट कोहलीबाबत पुन्हा एकदा वक्तव्य केलं आहे. त्याने म्हटले आहे की, फलंदाजाचे काम धावा करणे आणि गोलंदाजाचे काम विकेट घेणे आहे. अशा स्थितीत विराटप्रमाणेच सर्व फलंदाज या मानसिकतेने टी-२० विश्वचषकात उतरतील. विराट कोहलीने फक्त धावा करण्याचा विचार करावा, रेकॉर्ड बनवण्याचा किंवा तोडण्याच विचार करू नये.

भारत-पाक सामन्यापूर्वी गंभीर एका कार्यक्रमात म्हणाला, ‘धावा काढण्याच्या मानसिकतेशिवाय फलंदाजाला इतर कशाचीही गरज नसते. फलंदाजाचे काम धावा काढणे, तर गोलंदाजाचे काम विकेट घेणे. धावा काढणे म्हणजे ज्यामुळे तुमचा संघ जिंकतो. अशा धावा नाही ज्या तुमच्या रेकॉर्डवर जातात. तुम्ही 40 किंवा 30 स्कोअर करा परंतु तुमचा संघ 170/180 पर्यंत पोहोचू शकतो असा विचार करून करा. जर तुम्ही लक्ष्याचा पाठलाग करत असाल तर अशा धावा करा ज्यामुळे खालच्या मधल्या फळीवरील दबाव कमी होईल.

तसेच पुढे बोलताना तो म्हणाला की, ‘माझा विश्वास आहे की जेव्हा तुम्ही अशा सर्व स्पर्धांना जाता तेव्हा वैयक्तिक रेकॉर्ड घरी ठेवले पाहिजेत. जर तुम्ही ऑस्ट्रेलियाला जात असाल तर तुम्ही भारताचा विचार केला पाहिजे कारण या स्पर्धेत वैयक्तिक विक्रमाला काहीच किंमत नाही. विश्वचषक जिंकण्यात महत्त्व आहे. जर संघ जिंकला तर तो तुमचा अभिमान आहे.

गंभीर असंही म्हणाला की, जर तुम्ही 500 धावा केल्या आणि संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला नाही, तर त्या धावा फक्त तुमच्या रेकॉर्डमध्ये जमा होतात. बाकी टीका संपूर्ण संघाला सहन करावी लागते. दरम्यान, गंभीरचं हे विधान विराट कोहलीला उद्देशून असल्याचं बोललं जातंय.

इतर बातम्या
Gautam Gambhir: गौतम गंभीर घेणार आता भारतीय संघाने अनेक निर्णय, मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी
Virat Kohli: इतिहासाची होणार पुनरावृत्ती, कोहलीने पाकिस्तानी अँकरसोबत काढला फोटो, ‘बॅड लक झालं सुरू’
Virat Kohli : केएल राहूलमध्ये विराट कोहलीपेक्षा जास्त क्षमता; गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य

Tags: cricketgambhirkohlirecordकोहलीगौतमटीम इंडिया

Rahul

Next Post
sachin tendulkar

Sachin Tendulkar: ‘मला वाटते ‘या’ संघानेच वर्ल्डकप जिंकावा’; सचिन तेंडूलकरने सांगीतली मनातली इच्छा

ताज्या बातम्या

欧易okex官网_欧易okex官网下载_欧易okx官网遗鸥软件下载 – 开代理微信-373780805

January 5, 2023

返佣虚拟货币_HT是什么货币_数字区块链新闻资讯中金网 – form – www.bex.ink

January 5, 2023

火币网平台代理片软新闻–海量资讯的新闻服务平台 – 開代理拿返傭WeChat-373780805

January 5, 2023

OKX欧易交易所APP下载_欧易官网打不开了 – www.bex.ink

January 5, 2023

欧易app软件下载欧易官方版绿盟 – Affiliate Wechat-373780805

January 5, 2023

欧易okx下载欧易okx汉化版最新版 – 开代理微信-373780805

January 5, 2023
  • Privacy Policy

© 2022.

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • आयपीएल
  • अन्य खेळ
  • लेख

© 2022.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
WhatsApp Group